महाराष्ट्र राज्य सर्व क्षेत्रात आघाडीवर ठेवण्यास व चांगली समाजसेवा करण्याचे बळ दे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. २१ फेब्रुवारी २०२२ । कोल्हापूर । महाराष्ट्र राज्य सर्व क्षेत्रात आघाडीवर ठेवण्यासाठी व चांगली समाजसेवा करण्याचे बळ दे, असे साकडे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी आई श्री अंबाबाई चरणी घातले.

पर्यटनमंत्री श्री ठाकरे यांनी आज करवीर निवासिनी श्री अंबाबाई ( श्री महालक्ष्मी ) मंदिरास भेट देऊन श्री अंबाबाईचे दर्शन घेतले. यावेळी पर्यटन मंत्री श्री ठाकरे यांच्या समवेत उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार धैर्यशील माने, जिल्हाधिकारी राहुल रेखावार उपस्थित होते.

देवस्थान समितीच्या वतीने जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हस्ते पर्यटन मंत्री श्री. ठाकरे यांचा सत्कार करण्यात आला.

श्री अंबाबाईच्या दर्शनानंतर पर्यटन मंत्री श्री ठाकरे यांनी मंदिर परिसराची पाहणी केली.


Back to top button
Don`t copy text!