
या मोहिमे अंतर्गत सातारा विभागातील प्रत्येक पोस्ट ऑफिसमध्ये पोस्ट होणाऱ्या प्रत्येक राखी पाकिटावर देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव : “देशाचे रक्षण करणाऱ्या माझ्या धाडसी भावासाठी” असे लिहून प्रेषक म्हणून स्वतःचा पत्ता लिहावा व सदर राखी पाकीट संबधित पोस्ट ऑफिसच्या पोस्टमास्तर कडे जमा करावे. अशाप्रकारे सर्व पोस्ट ऑफिस मध्ये जमा झालेली पाकिटे ५ ऑगस्ट २०२२ पर्यंत डिव्हिजनच्या हेड पोस्टऑफिस मध्ये जमा केली जातील व त्याची एक स्वत्रंत्र बॅग बांधून ती बॅग कमांडिंग ऑफिसर यांच्या नावे हेड पोस्टमास्टर यांच्या पत्रासह सैनिकांसाठी दिलेल्या पत्यावर पाठवण्यात येईल. तरी सातारा जिल्हयातील जनतेला आवाहन करण्यात येते कि, देशाची अहोरात्र सेवा करणाऱ्या सैनिकांसाठी भारतीय टपाल विभागामार्फत राबवण्यात येत असलेल्या उपक्रमामध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे व सैनिकांना राख्या पाठविण्यासाठी सुरु केलेल्या वरील व्यवस्थेचा लाभ घ्यावा. वरील बाबतीत काही अडचण असल्यास पोस्ट ऑफिस मधील कर्मचाऱ्यांची मदत घ्यावी.