फलटण-बारामती व फलटण-पंढरपूर रेल्वेलाईनसाठी १२० कोटी निधीची तरतूद; खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नांना यश


दैनिक स्थैर्य | दि. ०५ फेब्रुवारी २०२३ | फलटण |
चारच दिवसांपूर्वी महाराष्ट्र सरकारने फलटण-पंढरपूर रेल्वेच्या संदर्भामध्ये निधीची तरतूद केली व मंजुरी दिली. त्याच पार्श्वभूमीवर शनिवारी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी तातडीने अर्थमंत्री निर्मला सीतारामन व रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन या बजेटच्या पुरवणी मागणीमध्ये फलटण-बारामती जे रेल्वेचे काम सुरू आहे त्यासाठी रेल्वेलाईन टाकण्यासाठी १०० कोटी व फलटण-पंढरपूरसाठी २० कोटींची तरतूद बजेटमध्ये करावी, अशी मागणी केली. त्याची दखल घेऊन वित्तमंत्री निर्मला सीताराम यांनी बजेटमध्ये १२० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. आता फलटण-बारामती रेल्वे आपणाला धावताना दिसेल तसेच केंद्र सरकारने फलटण-पंढरपूर रेल्वे सुरू करण्याबाबत सुरुवातीची तरतूद म्हणून २० कोटी रुपये मंजूर केले.

यावेळी केंद्रीय रेल्वेमंत्री यांनी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना सूचित केले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर्षीच फलटण -पंढरपूर रेल्वेसाठी लागणारा संपूर्ण निधी देण्याबाबतचे आदेश दिले आहेत. जेणेकरून फलटण-पंढरपूर रेल्वे मार्ग सुरू होऊन देशातील व महाराष्ट्रातील तमाम वारकरी व जनतेसाठी ही सेवा सुरू राहणार आहे. त्यामुळे फलटणकर व पंढरपूरच्या जनतेने पाहिलेले स्वप्न होते ते आपल्याला काहीच दिवसात पूर्ण झालेले दिसेल. तसेच लोकसभा निवडणुकीमध्ये दिलेल्या आश्वासनांच्या पूर्ततेपेक्षा जास्त कामे या मतदारसंघात होताना दिसत आहेत. यासाठी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी खूप प्रयत्न केले आहेत.

याबाबत माढा लोकसभा मतदारसंघातील जनता खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे आभारी राहणार आहे. यामुळे फलटण-पंढरपूर, फलटण-बारामती, फलटण-लोणंद लवकरच औद्योगिकीकरणाचं स्वप्नही आपल्याला पूर्ण झालेले दिसेल. तसेच खूप मोठी आर्थिक चालना या भागाला मिळणार आहे. त्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघातले पाणी व रेल्वेचे जे प्रश्न आहेत ते प्रत्यक्षात आता मार्गी लागल्याचे आपणास दिसत आहेत. याबद्दल खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपाचे केंद्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, वित्तमंत्र निर्मला सीतारामन, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.


Back to top button
Don`t copy text!