पालकांच्या सहभागाशिवाय शिक्षण अपूर्ण : सरपंच सागर अभंग


दैनिक स्थैर्य । 04 मे 2025 । विडणी । विडणी गावातील जि. प. प्रा. शाळा विद्यानगर येथे इयत्ता ५ च्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभात सरपंच सागर अभंग यांनी पालकांना मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी सक्रिय भूमिका निभावीची गरज भारून सांगितली. यावेळी शैक्षणिक गुणवत्ता, स्पर्धात्मक परीक्षा आणि भविष्यातील आव्हानांवर विद्यार्थ्यांना तयार करण्यासाठी शिक्षक-पालक सहकार्याचे महत्त्व प्रतिपादन करण्यात आले

सरपंच सागर अभंग यांनी सांगितले की, “प्राथमिक शिक्षण हा विद्यार्थ्यांच्या यशाचा पाया असतो. परंतु शिष्यवृत्ती, नवोदय सारख्या स्पर्धांमध्ये गुणवत्तेसह उत्तीर्ण होण्यासाठी केवळ शिक्षकांचे प्रयत्न पुरेसे नाहीत. पालकांनीही मुलांच्या दैनंदिन अभ्यासाकडे, मोबाइलच्या वापराकडे आणि सर्जनात्मक कौशल्यांकडे लक्ष द्यावे.” त्यांनी शाळेतील शिक्षकांनी घेतलेल्या अतिरिक्त तासांचे कौतुक करताना विद्यार्थ्यांनी यशाच्या “सुंदर इमारती”ची उभारणी करावी अशी अपेक्षा व्यक्त केली.

मुख्याध्यापक राजाराम तांबे यांनी नमूद केले की, “प्रा. रवींद्र परमाळे यांसारख्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी जादा तास घेऊन मार्गदर्शन केले. त्यांच्या कष्टामुळेच ही शाळा गुणवत्तेच्या यादीत स्थान मिळविणारी बनली आहे.” परमाळे यांनीही पालकांना सल्ला देताना स्पष्ट केले की, “मुलांवर ध्येय निश्चित करण्यासाठी दडपण न आणता, त्यांना व्यसनांपासून दूर ठेवणे गरजेचे आहे.”

सरपंच अभंग यांनी गरिबांना शैक्षणिक सहाय्य देण्याचे आश्वासन दिले तर पालकांनी मुलांच्या “सामाजिक-भावनिक गरजा” लक्षात घ्याव्यात असे सुचवले. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी गुरुजनांना फेटा व गुलाब देऊन शुभेच्छा दिल्या.


Back to top button
Don`t copy text!