निरा – देवधर व कृष्णा – भिमा स्थिरीकरणाच्या कामांना गती देणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


दैनिक स्थैर्य । दि. १२ ऑगस्ट २०२२ । सातारा । सातारा व सोलापूर जिल्ह्याच्या भेडसावणाऱ्या शेती पाण्याचा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून निरा-देवघर व कृष्णा-भिमा स्थिरीकरणाकडे बघितले जाते. निरा – देवघर व कृष्णा – भीमा स्थिरीकरणाच्या रखडलेल्या कामाला गती देण्याचे काम लवकर हाती घेणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना दिले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच सातारा जिल्ह्यातील दरे या आपल्या मूळ गावी आले असता त्यांचे स्वागत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पुष्पगुच्छ देऊन केले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यात मतदारसंघातील विविध विकासकामांच्या बाबत प्रदीर्घ चर्चा झाली. यामध्ये प्रामुख्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सातारा व सोलापूर जिल्ह्याचा जिव्हाळ्याचा व शेती पाण्याचा महत्वकांक्षी प्रकल्प असलेल्या निरा – देवघर व कृष्णा – भीमा स्थिरीकरणाबाबत माहिती घेऊन निरा – देवघरचे रखडलेले व उर्वरित कामास मान्यता देवू.तसेच कृष्णा-भीमा स्थिरीकरणासंदर्भात विधिमंडळाकडून लवकरच या प्रकल्पाची मान्यता घेऊन दोन्हीही महत्त्वाकांशी प्रकल्पाच्या कामास लवकरच सुरुवात करण्याचा शब्द मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी खासदार निंबाळकरांना यावेळी दिला.

धोम धरणाचे पुराचे पाणी नदीत सोडून नदीकाठच्या गावातील लोकांच्या जिवीतास व मालमत्तेस धोका आणण्या ऐवजी त्यातील काही पाणी धोम बलकवडी कॅनॉल मध्ये सोडण्यात यावे अशी विनंती मुख्यमंत्र्यांना खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केली या संदर्भात ताबडतोब पाणी धोम धरणातून धोम बलकवडी कॅनॉल मध्ये सोडण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे धोम धरणाचे पुराचे पाणी कॅनॉल मध्ये सोडण्यात येणार आहे.


Back to top button
Don`t copy text!