नीरा खोऱ्यातील धरणसाठा ९३ टक्क्यांवर, मात्र गतवर्षीच्या तुलनेत कमी

भाटघर धरण ९८ टक्क्यांच्या पुढे; नदीतील विसर्ग पूर्णपणे बंद


स्थैर्य, फलटण, दि. ११ ऑगस्ट : नीरा उजवा कालवा विभागाने आज, दि. ११ ऑगस्ट रोजी जाहीर केलेल्या अहवालानुसार, नीरा खोऱ्यातील प्रमुख धरणांमध्ये एकूण ९३.१५ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. मात्र, गतवर्षीच्या तुलनेत हा पाणीसाठा सुमारे ५ टक्क्यांनी कमी आहे. गेल्या वर्षी आजच्या दिवशी धरणांमध्ये ९७.९९ टक्के पाणीसाठा होता.

आजच्या अहवालानुसार, भाटघर धरण ९८.०९ टक्के (२३.०५ टीएमसी), निरा देवघर धरण ९२.१६ टक्के (१०.८१ टीएमसी) आणि वीर धरण ९०.०१ टक्के (८.४७ टीएमसी) भरले आहे. गुंजवणी धरणात ७२.९० टक्के (२.६९ टीएमसी) पाणीसाठा उपलब्ध आहे.

धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने उघडीप दिली असून, केवळ निरा देवघर आणि गुंजवणी परिसरात प्रत्येकी २ मिमी पावसाची नोंद झाली आहे. पाण्याची आवक मंदावल्याने नदीपात्रातील विसर्ग पूर्णपणे बंद ठेवण्यात आला आहे. सध्या केवळ कालव्यांद्वारे शेतीसाठी पाणीपुरवठा सुरू आहे.


Back to top button
Don`t copy text!