
स्थैर्य, दि.१९: पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद आणि केरळच्या एर्नाकुलम येथून अलकायदाच्या नऊ दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एनआयए) ही कारवाई केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या लोकांवर दिल्ली एनसीआर आणि वर्दळीच्या ठिकाणी बॉम्बस्फोट करण्याची जबाबदारी सोपवली होती. एनआयएची कारवाई अद्याप सुरूच आहे.
अटक केलेल्या दहशतवाद्यांमध्ये लियु यीन अहमद आणि अबु सूफियान पश्चिम बंगालचे, तर मुशर्रफ हुसेन आणि मुर्शीद हसन केरळचे आहेत.
यूएनच्या अहवालात भारताला इशारा देण्यात आला होता
दहशतवादाबाबत दोन महिन्यांपूर्वी संयुक्त राष्ट्र संघाने एक अहवाल जारी केला होता. केरळ आणि कर्नाटकमध्ये मोठ्या संख्येने आयएस दहशतवादी असू शकतात असा इशारा यात देण्यात आला. तसेच भारतीय उपखंडात अल कायदा (एक्यूआयएस) या दहशतवादी संघटनेने हल्ल्याचा कट रचला आहे, असा दावाही अहवालात केला होता. एक्यूआयएसचा सध्या मुख्य सूत्रधार ओसामा महमूद आहे, त्याने आसिम उमरची जागा घेतली आहे. ओमरच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी तो या भागात कट रचत आहे.
अहवालात म्हटले होते – अल कायदाचे 200 दहशतवादी असू शकतात
अहवालात आयएसच्या मदतनीस देशाने म्हटले आहे की भारतीय उपखंडात अल कायदाचे 180 ते 200 दहशतवादी आहेत. ते भारत, पाकिस्तान, बांगलादेश आणि म्यानमारमधील आहेत. भारतीय उपखंडात अल कायदा हा आयएसचा सहकारी आहे.