
स्थैर्य, सातारा, दि. 28 नोव्हेंबर : महाबळेश्वर तालुक्यातील पांगारी आणि भोसे परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वाढता वावर ही चिंतेची बाब ठरली होती. ग्रामीण भागात दिवस-रात्र भटकंती करणार्या बिबट्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीती पसरली होती. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन वनविभागाने भोसे परिसरात बिबट्याला पकडण्यासाठी एक कुशलतेने तयार केलेला पिंजरा उभारला होता. या उभारलेल्या पिंजर्यात बिबट्याला अलगद अडकला. त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
याबाबत अधिक माहिती अशी की, महाबळेश्वर तालुक्यातील पांगारी आणि भोसे परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वाढता वावर ही चिंतेची बाब ठरली होती. ग्रामीण भागात दिवस-रात्र भटकंती करणार्या बिबट्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीती पसरली होती. शेतकरी, महिला आणि विद्यार्थ्यांना घराबाहेर पडताना दहशतीचे सावट निर्माण झाल्याने ग्रामस्थांनी वनविभागाकडे वारंवार तक्रारी नोंदवल्या होत्या.
बिबट्याच्या हालचालींची गंभीर नोंद घेत वनविभाग त्वरित सक्रिय झाला.जनजागृती मोहीम राबवून नागरिकांना सावधगिरीच्या सूचना देण्यात आल्या. रात्रीच्या वेळी बाहेर पडताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले.पशुधन सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन प्रदान केले.पांगारी-भोसे परिसरात रात्रगस्त वाढवून वनकर्मचारी सातत्याने परिस्थितीवर लक्ष ठेवू लागले.परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन वनविभागाने भोसे परिसरात बिबट्याला पकडण्यासाठी एक कुशलतेने तयार केलेला पिंजरा उभारला होता.
वनविभागाच्या प्रयत्नांना अखेर यश आलं. भोसे येथे उभारलेल्या पिंजर्यात बिबट्या अडकला आणि संपूर्ण गावात आनंदाची लाट उसळली. भीतीच्या सावटातून मुक्त झालेल्या नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला. ग्रामस्थांनी वनविभागाच्या तत्परता, दक्षता आणि मेहनतीचे कौतुक करत त्यांच्या कार्याला सलाम केला आहे.

