कारगिलमध्ये जवान भास्कर वाघ शहीद


स्थैर्य, बार्शी, दि. १६ : भारतीय सैन्य सेवेत असलेल्या बार्शीपुत्र जवानाचा अपघाती मृत्यू झाल्याची दुर्घटना मंगळवारी घडली. कारगिल येथून कर्तव्य बजावून घराकडे परतत असताना त्यांच्या वाहनाला अपघात झाल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली. मात्र, कर्तव्यावर असताना ही घटना घडल्याने त्यांना शहीद दर्जा देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. भास्कर सोमनाथ वाघ (वय 40) असे या शहीद जवानाचे नाव आहे.

भास्कर वाघ हे गेल्या 20 वर्षांपासून भारतीय सैन्यसेवेत होते. मूळचे पाथरीजवळील वाघाची वाडी ता. बार्शी गावचे सुपुत्र असलेले वाघ हे कर्तव्य बजावून घराकडे निघाले होते. दरम्यान, त्यांच्या वाहनाला अपघात झाल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सोमनाथ हे मूळचे वाघाची वाडी येथील रहिवाशी आहेत. सध्या, मुलांच्या शिक्षणासाठी त्यांची पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा असं कुटुंब सध्या पुण्यात राहत होते. तर, आई-वडील मूळ गावीच आहेत. सुट्टी घेऊन आल्यावर ते गावाकडेच येत. गावातील मित्र परिवार आणि गावकऱ्यांसोबत त्यांचा जिव्हाळा होता. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच गावात शोककळा पसरली.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!