
दैनिक स्थैर्य । दि.०१ एप्रिल २०२२ । मुंबई । कोरोनाच्या सावटाखाली दोन वर्षे गेल्यानंतर यंदा गुढीपाडवा तसेच नववर्षाचे स्वागत सर्वांना पारंपरिक उत्साहाने व निर्भयपणे करता येणार आहे याचा खूप आनंद होत आहे. हा मंगल दिवस तसेच आगामी वर्ष सर्वांच्या जीवनात उत्तम आरोग्य, सुख, समाधान व समृद्धी घेऊन येवो या शुभेच्छा देतो. युगादी, चेटी चाँद तसेच संसर पाडवो निमित्त देखील मी सर्वांना शुभेच्छा देतो, असे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.