
दैनिक स्थैर्य । दि. २५ डिसेंबर २०२२ । फलटण । नांदल, ता. फलटण येथे कृषीदुतांमार्फत शेतकरी दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी विद्यार्थ्यांनी शेतक-यांशी संवाद साधला. यामध्ये ऊसाप्रमाणेच इतर फळबागांची लागवड याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. फळबागांच्या माध्यमातून शेतकरी आपला जीवनस्तर कसा उंचावू शकतो याविषयी कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी पाच दिवस वेगवेगळ्या उपक्रमांद्वारे दाखवणार आहेत.
यावेळी कृषी अधिकारी सतीश निंबाळकर, कृषी पर्यवेक्षक योगेश भोंगळे, कृषी सहायक अरविंद नाळे, नितीन कोळेकर यांनी मार्गदर्शन केले.
प्राचार्य सागर निंबाळकर, समन्वयक निलीमा धालपे, कार्यक्रम अधिकारी स्वप्नील कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली युवराज काळे, धीरज कणसे, ऋषिकेश चव्हाण, विवेक पाठक, गणेश अवताडे, गणेश बोराटे, पृथ्वीराज बाबर यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.