विधानपरिषद विशेषाधिकार समितीकडे विचारार्थ प्रलंबित दोन प्रकरणांवरील अहवाल सादर करण्यास मुदतवाढ

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. ७ जुलै २०२१ । मुंबई । विधानपरिषद सदस्य प्रा.डॉ.मनीषा कायंदे व भाई जगताप यांनी अर्णब गोस्वामी, संपादक, वृत्त निवेदक व कार्यक्रम सूत्रसंचालक रिपब्लिक टीव्ही वृत्तवाहिनी यांचेविरुध्द दिनांक ०८ सप्टेंबर, २०२० रोजी उपस्थित केलेले विशेषाधिकार भंग व अवमानाचे प्रकरण तसेच विधानपरिषद सदस्य भाई जगताप यांनी हिंदी सिनेअभिनेत्री कंगना राणावत यांचेविरुद्ध दिनांक ०८ सप्टेंबर, २०२० रोजी उपस्थित केलेले विशेषाधिकार भंग व अवमानाचे प्रकरण या दोन प्रकरणांवरील विशेषाधिकार समितीचे अहवाल सादर करण्याकरिता महाराष्ट्र विधानपरिषद नियम १७८ च्या पोट-नियम (१) च्या परंतुकान्वये पुढील अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत मुदतवाढ देणारा प्रस्ताव विधानपरिषदेत मंजूर करण्यात आला. याबाबत समिती प्रमुख, विधानपरिषद विशेषाधिकार समिती प्रा.डॉ.मनीषा कायंदे यांनी विधानपरिषदेत प्रस्ताव मांडला होता


Back to top button
Don`t copy text!