विविध राज्यातून व जिल्ह्यातून ई – पास वगळता 25641 नागरिक सातारा जिल्ह्यात दाखल

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा दि. 20 : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील विविध राज्य व केंद्रशासित प्रदेशामधून तसेच महाराष्ट्र राज्याच्या इतर जिल्ह्यातून 17 मे अखेर ई-पास वगळता 25641 नागरिकांनी चेक पोस्टवरुन सातारा जिल्ह्यात प्रवेश केला आहे. 

यामध्ये देशातील  आंध्रप्रदेश, उत्तरप्रदेश, ओडिसा, कर्नाटक, केरळा, गुजरात,गोवा, झारखंड, तामीळनाडू,  तेलंगणा, दादरा आणि नगर हवेली, पंजाब, पश्चिमबंगाल, बिहार,मध्यप्रदेश, राजस्थान, दिल्ली आणि हरियाना मधून 1741 नागरिकांनी प्रवेश घेतला आहे. तर 23900 हे राज्यातील इतर जिल्ह्यातून आले आहेत.

सातारा जिल्ह्यात प्रवेश करुन विविध तालुक्यात गेलेल्यांची संख्या तालुका निहाय पुढीलप्रमाणे- कराड-3296, कोरेगाव-1470, खंडाळा-1104, खटाव-3119, जावळी-1470, पाटण-2562, फलटण-2172, महाबळेश्वर- 1401, माण-2372, वाई-1930 व सातारा तालुका-4745 अशा एकूण 25641 नागरिकांनी विविध तालुक्यात प्रवेश केला आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!