
स्थैर्य, सातारा, दि. 27 डिसेंबर : सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी वनहद्दीत प्रवेश करून त्या ठिकाणी पार्या होऊ नयेत, यासाठी 28 डिसेंबर ते एक जानेवारी या कालावधीमध्ये वनक्षेत्रात येण्यास वन विभागाने बंदी घातली असल्याची माहिती रोहोटचे वनपाल राजाराम काशीद यांनी दिली.
कास पठार व परिसर हा निसर्गसंपन्न असून, या परिसरात मोठ्या प्रमाणात पार्त्या केल्या जातात. वन विभाग व कास पठार कार्यकारिणी समिती यांनी सेवनक्षेत्रात प्रवेश करणे, जेवण करणे, मद्यपान करणे, वणवा लावणे अशा कोणत्याही प्रकारे वनहद्दीत प्रवेश केल्यास त्यांच्यावर तत्काळ कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी तरुण शहरापासून दूर ठोसेघर, चाळकेवाडी, रोहोट, भांबवली, कास अशा वन विभागाच्या कार्यक्षेत्रात पार्ट्या करण्यासाठी जातात. यामुळे वनहद्दीत वन्य प्राण्यांना त्रास होत असतो, तसेच या ठिकाणी प्लॅस्टिकचा कचराही होत असतो. याला प्रतिबंध होण्यासाठी हे निर्बंध घातले असून, वनहद्दीत प्रवेश करणार्यांवर तत्काळ कारवाई करणार असल्याचे काशीद यांनी सांगितले
31 डिसेंबरपर्यंत वनक्षेत्रात कास पठार समिती व वन विभागाच्या वतीने नाकाबंदी करण्यात येणार आहे. कासाणी पार्किंगजवळ चूल पेटवून पार्टी करताना सापडलेल्या लोकांवर दीड हजाराचा दंड आकारून नुकतीच कारवाई करण्यात आली.
