वक्फ मंडळाकडून निवडणुकीबाबत आवाहन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. ७ जुलै २०२१ । मुंबई । महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळावर मुतवल्ली प्रवर्गातील सदस्याची निवडणुकीद्वारे निवड करण्याकरिता वक्फ संस्थांच्या पात्र मुतवल्लीची/व्यवस्थापकीय समितीच्या नामनिर्देशित सदस्याची मतदारयादी अद्ययावत करण्याबाबत मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिस शेख यांनी आवाहन केले आहे.

एक लाख रूपयांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असलेल्या वक्फ संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी मुतवल्ली/नामनिर्देशित सदस्याचे नाव मतदारयादीत समाविष्ट करण्याकरिता सन २०२०-२१ या वर्षापर्यंतचे संबंधित वक्फ संस्थेचे लेखापरीक्षण करून वार्षिक लेखे व त्या अनुषंगिक वर्गणी जमा करावयाची आहे. यासाठीची मुदत वाढविण्यात आली आहे. ही कार्यवाही संबंधीत वक्फ संस्थांनी ३१ जुलै २०२१ पर्यंत पूर्ण करावी, असे आवाहन श्री. शेख यांनी केले आहे. राज्यातील सर्व वक्फ संस्थांचे मुतवल्ली/ व्यवस्थापकीय समितीचे सदस्य यांना हे आवाहन करण्यात आले आहे.


Back to top button
Don`t copy text!