स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण शहर
  • फलटण तालुका
  • सातारा जिल्हा
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • संपर्क
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

सत्तांतर करून काय एकाच घरात सत्ता आणायची का ?; कोळकीत विरोधकांवर श्रीमंत संजीवराजे यांची बोचरी टीका

Team Sthairya by Team Sthairya
January 10, 2021
in फलटण तालुका, सातारा जिल्हा

स्थैर्य, कोळकी, दि. ९ : कोळकी गावामध्ये भाजपाला उमेदवारच मिळत नसल्याने एका घरात दोन तीन जणांना संधी देत आहेत आणि वर म्हणत आहेत कि सत्तांतर करायची आहे सत्तांतर करून काय एकाच घरात सत्ता आणायची का ? असा सवाल सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केला. दरम्यान कोळकी गावची वाढती लोकसंख्या पाहता गावांमध्ये माणशी पन्नास लिटर पाणी पुरवठा करण्याच्या दृष्टीने जल मिशन योजनेचा लाभ घेणार असून त्याबाबतचा आराखडा अंमलात आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे श्रीमंत संजीवराजे म्हणाले.

कोळकी ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचार शुभारंभाच्या सभेदरम्यान श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, कोळकी गाव गेली अनेक वर्षे श्रीमंत रामराजेंच्या पाठीशी खंबीर पणे उभे आहे. पूर्वीची कोळकी आणि आजची कोळकी यात बराच फरक आहे. मतदारांच्या मानाने रहिवाशांची संख्या खूप वाढलेली आहे. आता वाढता तगाव झाला असून त्या दृष्टीने सुविधा पुरवणे गरजेचे आहे. गेल्या पंचवार्षिकला कोळकीसाठी पाणी पुरवठा योजना कार्यान्वित केली होती. मात्र दोन वर्षे वाढत्या रहिवास्यांमुळे योजना अपुरी पडू लागलेली आहे. त्यामुळे आगामी काळात दुसरी पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करावी लागणार आहे. सध्या गिरवी व अन्य पाणीपुरवठा योजना सुरू असल्या तरी पाण्याचा वापर वाढल्याने जल मिशन योजनेतून कोळकीमध्ये प्रति माणसी ५५ लिटर पाणी मिळण्याच्या दृष्टीने सध्याचा योजनांमध्ये बदल करणे आवश्यक आहे. त्याबाबतचा आराखडा बनवला असून त्यासाठी कितीही खर्च आला तरी तो अमलात आणण्याचे काम सुरू आहे. गावातील महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पाणी आहे. तो जलजीवन मिशन योजनेची संधी घेऊन आपण सोडणार आहोत. त्याचबरोबर कोळकी गावामध्ये फलटण शहरात सारखीच भूमिगत गटारे करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ही योजना राबविण्यात येणारी जिल्ह्यात फक्त दोन गावे आहेत. कराड तालुक्यातील बनवडी आणि फलटण तालुक्यातील कोळकी.

या वेळी बोलताना श्रीमंत संजीवराजे म्हणाले कि, यापुढील काळात कोळकीच्या विकासासाठी विधान परिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून तसेच आपण स्वतः झुकते माप देणार आहोत. कोळकीच्या वाढत्या लोकसंख्येच्या दृष्टीने असे झुकते माप देणे क्रमप्राप्तच आहे.

कोळकीला फलटण शहरात समाविष्ट करावे, अशा बऱ्याचदा मागणी होत असते. परंतु शहरात येण्यापेक्षा कोळकीलाच नगरपंचायतीचा दर्जा देऊन गावचे वेगळे अस्तित्व कायमस्वरूपी बनावे, अशी ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचीच इच्छा आहे. फलटण तालुक्यातील जाधववाडी व कोळकी या दोन ग्रामपंचायतीला नगरपंचायत बनवण्यासाठी पावले उचलण्यात येत आहेत. कारण जादाचा निधी नगरपंचायतीद्वारे मिळू शकतो. त्यादृष्टीने नगरपंचायत होणे गरजेचे आहे, असेही श्रीमंत संजीवराजे यांनी स्पष्ट केले.

सध्या भाजपाकडूनही ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा प्रचार सुरू आहे. परंतु त्यांना उमेदवारीलच मिळत नसल्याने एकाच घरात दोन, दोन, तीन, तीन जणांना संधी देत आहेत, आणि म्हणतात की सत्तांतर करणार. सत्तांतर करून काय एकाच घरात सत्ता आणणार काय ?, असा सवाल यावेळी श्रीमंत संजीवराजे यांनी केला.

श्रीमंत रामराजे यांच्या सूचनेनुसार जे उमेदवार दिले आहेत त्यामध्ये तरुणांना वाव देण्यात आला आहे. नव्या दमाच्या तरुण मंडळींना वाव देण्याची संधी दिली असली तरी याबाबत विरोधकांकडून समज गैरसमज पसरवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु ज्याला राजे गटातर्फे उभे केले आहे, त्यालाच पाठिंबा देणार आहोत. या उमेदवारांना पाठीशी राहावे असे आवाहनही श्रीमंत संजीवराजे यांनी केले.


📣 दैनिक स्थैर्य आता टेलिग्रामवर आहे. दैनिक स्थैर्यच्या अधिकृत टेलिग्राम चॅनेलला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करावे.

ADVERTISEMENT
Previous Post

एकाच घरात दोन – तीन उमेदवार देवून विरोधक म्हणतात कोळकीत सत्तांतर करणार : श्रीमंत संजीवराजे

Next Post

नगरपंचायतीत रुपांतर करुन कोळकीचे स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवण्याचा मानस : श्रीमंत संजीवराजे

Next Post

नगरपंचायतीत रुपांतर करुन कोळकीचे स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवण्याचा मानस : श्रीमंत संजीवराजे

ताज्या बातम्या ई-मेलवर मिळवा

Join 1,029 other subscribers

जाहिराती

ताज्या बातम्या

साताऱ्यातील ओझर्डे येथील जवान सोमनाथ अरविंद तांगडे यांच्यावर अंत्यसंस्कार

April 19, 2021

खासदार संजय राऊत गुंफणार महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेचे ३१ वे पुष्प

April 19, 2021

फलटण शहरामध्ये विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची करण्यात आली कोरोना चाचणी; ५० पैकी ७ रुग्ण आले पॉझिटिव्ह

April 19, 2021

फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयातून कोरोना बाधित रुग्णाचे पलायन; गचाळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर

April 19, 2021

पत्रकार रफिक मुल्ला यांना पितृशोक

April 18, 2021

अन्यायाचा वेळीच प्रतिकार करा, शासन खंबीरपणे महिलांच्या पाठीशी – महिला व बालविकासमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

April 18, 2021

शालिनीताई मेघे रुग्णालयाला पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांची भेट

April 18, 2021

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ऑक्सिजनचा पुरवठा वाढविणार – पालकमंत्री उदय सामंत

April 18, 2021

भक्ती व प्रेमाचा संदेश देणाऱ्या महाराष्ट्रातील संतांचा शीख व काश्मिरी तत्वज्ञानावर प्रभाव – सामाजिक कार्यकर्ते संजय नहार

April 18, 2021

फलटणमध्ये विनाकारण फिरणाऱ्यांच्या कोरोना चाचण्या; पाच जण कोरोनाबाधित

April 18, 2021
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Home
  • संपर्क

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण शहर
  • फलटण तालुका
  • सातारा जिल्हा
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • संपर्क

Website maintained by Tushar Bhambare.