तीन महिने घरात असलेल्या मंडळींनी आता यवतेश्‍वर, कास, बामणोलीकडे आपला मोर्चा वळवला

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि. 11 : करोनाचा धोका लक्षात घेऊन लॉकडाउन करण्यात आले होते. लॉकडाउनमध्ये काही शिथिलता आल्याने गेली अडीचे ते तीन महिने घरात असलेल्या मंडळींनी आता यवतेश्‍वर, कास, बामणोलीकडे आपला मोर्चा वळवला आहे.

कास-बामणोलीकडे लोकांची गर्दी वाढत असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी लगेच धाव घेऊन अनेकांवर दंडात्मक कारवाई केली. शासनाने आता सर्वसामान्यांचे जीवन  सोपे व्हावे म्हणून काही गोष्टींमध्ये सवलती दिल्या आहेत.

मात्र या सवलतींचा नागरिकांकडून गैरवापर होत आहे. विनाकारण एकत्र येण्यास मनाई असताना देखील अनके वाहने कास परिसरात आढळली. हौशीने फोटोसेशन केले. काही तरुण बाईक रायडिंग व स्टंट करत होते. यवतेश्‍वर, सांबरवाडी येथे वाहनांची तपासणी केली जात होती. अनेकांनी सोबत मास्कही आणले नव्हते. समोर दिसल्यानंतर तोंडाला रूमाल बांधत होते.शासन वेळोवेळी जनजागृती करत आहे. असे असताना स्वत: बरोबर दुसर्‍याच्या आरोग्याची काळजी घेऊन फक्त कारणासाठीच घरातून बाहेर पडावे, हे असतानाही काही तरुण मात्र हुल्लडबाजी करताना दिसत आहेत. प्रशासनाने याला चाप बसवावा.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!