• Contact us
  • Home
  • Privacy Policy
स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

नागरिकांनो घाबरू नका पण खारबारदारी घ्या; आपल्या निष्काळजीपणामुळेच कोरोना वाढतोय

Team Sthairya by Team Sthairya
जानेवारी 10, 2022
in अग्रलेख, इतर, देश विदेश, प्रादेशिक, फलटण, लेख, विशेष लेख, संपादकीय, सातारा जिल्हा

दैनिक स्थैर्य । दि. १० जानेवारी 2022 । सातारा । जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसची विविध लक्षणं आतापर्यंत समोर आली आहे. यातली चिंताजनक गोष्ट म्हणजे काही लक्षणं नव्याने समोर आली आहेत. या नव्या लक्षणांबद्दल WHO ने त्यांच्या वेबसाईटवर माहिती दिली आहे. त्याचबरोबर ओमिक्रॉनबाधित रुग्णांची संख्या देखील वाढते आहे. त्यामुळे सध्याची परिस्थिती किती गंभीर आहे ? लॉकडाऊनची होण्याची शक्यता आहे का ? असे अनेक प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडलेले आहेत. आपल्याला जर लॉकडाऊन टाळायचे असेल तर शाशनाने दिलेल्या निर्बंधांचे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे. नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही परंतु खबरदारी घेणे गरजेचे आहे. आपल्या सर्वांचा निष्काळजीपणाच कोरोना वाढीला कारणीभूत ठरत आहे. तरी नागरिकांनी कोरोना बाबतच्या त्रिसूत्रीचा अवलंब जर केला तर कोरोनाच्या कोणत्याही व्हेरियंटला आपण रोखू शकतो व लॉकडाऊन सुद्धा टाळू शकतो.

सध्या सगळीकडे मास्क अनिवार्य केला आहे. मास्क न वापरणाऱ्या लोकांना अनेक ठिकाणी दंड भरावा लागत असल्याच्याही बातम्या आपण वाचल्या असतील. मास्क वारण्यासोबतच आपण सर्वांनी कोरोना लसीकरणाचे दोन्ही डोस वेळेमध्ये घेणे गरजेचे आहे. लसीकरण झाल्यानंतर कोरोना होत नाही असे नाही परंतु कोरोना सोबत लढण्यासाठी आपले शरीर सज्ज असते. लसीकरण पूर्ण झाले असेल तर आपण गृह विलगीकरणामध्येच बरे होवू शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.

संसर्गाचा धोका टाळण्यासाठी खोकणाऱ्या किंवा शिंकणाऱ्या व्यक्तीपासून किमान 1 मीटर अंतरावर उभं राहण्याची शिफारस जागतिक आरोग्य संघटनेनं केली आहे. आपण सर्वानीच चेहऱ्यावर मास्क बांधावेत, असं जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितलं आहे. तोंडातून बाहेर पडणाऱ्या पाण्याच्या थेंबातून म्हणजेच ड्रॉपलेट्समधून विषाणूची लागण होते, या आधारावर हे अंतर ठरवण्यात आलेलं आहे. बहुतांश ड्रॉपलेट हवेत विरून जातात किंवा संबंधित व्यक्तीच्या आसपास खाली जमिनीवर पडतात, असं आतापर्यंत मानलं जात होतं. परंतु ओमिक्रोन हा व्हेरियंट अत्यंत वेगाने पसरत असल्याचे हि समोर आलेले आहे.

खोकल्यानंतर किंवा शिंकल्यानंतर तोंडातून छोटी मात्र वेगवान अशी हवा बाहेर पडते. याला संशोधकांनी क्लाऊड ऑफ गॅस म्हटलं आहे. या क्लाऊड ऑफ गॅसमध्ये वेगवेगळ्या आकाराचे पाण्याचे थेंब असू शकतात. यातले अतिसूक्ष्म थेंब दूरवर वाहून नेले जाऊ शकतात, असं या संशोधनात आढळून आलं आहे. प्रयोगशाळेतील नियंत्रित वातावरणात हा प्रयोग करण्यात आला. यात असं आढळलं आहे की अशापद्धतीने पाण्याचे अतिसूक्ष्म थेंब खोकलल्यानतंर 6 मीटर तर शिंकल्यानंतर 8 मीटर अंतरापर्यंत जाऊ शकतात.


Previous Post

इच्छुकांनो लागा तयारीला; नगरपालिका निवडणुका जाहीर होण्याची शक्यता ?

Next Post

सामाजिक कार्यात चिकाटी ठेवल्यास यश नक्की : सौ. वीणाताई पंडित

Next Post

सामाजिक कार्यात चिकाटी ठेवल्यास यश नक्की : सौ. वीणाताई पंडित

ताज्या बातम्या

आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी सोने-चांदी महागले, सोन्याचे दर ६० हजारांच्या पार, तपासा आजचे दर

मार्च 31, 2023

मोदींची डिग्री दाखण्याचा आदेश उच्च न्यायालयाने केला रद्द, केजरीवालांवर ठोठावला २५ हजाराचा दंड

मार्च 31, 2023

राहुल गांधींनी मनाचा मोठेपणा दाखवावा अन् OBC समाजाची माफी मागावी – कपिल पाटील

मार्च 31, 2023

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राहुल गांधी यांना घाबरतात; त्यामुळेच अशी कारवाई – प्रणिती शिंदेंचा आरोप

मार्च 31, 2023

महाराष्ट्र अस्थिर व्हावा ही सरकारची इच्छा; संजय राऊतांनी शिंदे-फडणवीसांना फटकारलं

मार्च 31, 2023

देशात पेट्रोल-डिझेल बंद होणार?; जल, वायू अन् ध्वनी प्रदूषणावर नितीन गडकरींचं भाष्य

मार्च 31, 2023

श्रीलंकेच्या उच्चायुक्तांनी घेतली राज्यपालांची भेट

मार्च 31, 2023

पौष्टिक तृणधान्य… काळाची गरज

मार्च 31, 2023

बौध्दजन पंचायत समिती मीरा भाईंदर गट क्रं.३३ चे मार्गदर्शन शिबिर संपन्न

मार्च 31, 2023

ना. डॉ. नीलमताई गोर्‍हे यांची कै. लोकनेते हिंदूरावजी नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट

मार्च 31, 2023
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Privacy Policy
  • Contact us

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.

Don`t copy text!