मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधानपरिषद गटनेते शरद रणपिसे यांना श्रद्धांजली

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. २३ सप्टेंबर २०२१ । मुंबई । विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते ज्येष्ठ नेते शरद रणपिसे यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे.

विधिमंडळातील त्यांचा वावर हा मार्गदर्शक असा होता. त्यांची राजकीय आणि सामाजिक भूमिका ठाम होती. संसदीय कार्यप्रणालीचा अभ्यास असणारे, मृदुभाषी आणि अनेक विषयांची मुद्देसूद मांडणी करण्याची हातोटी असणारा नेता म्हणून दिवंगत रणपिसे यांची उणीव निश्चितच भासत राहील. ज्येष्ठ नेते शरद रणपिसे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.


Back to top button
Don`t copy text!