
बारामती – अजित पवार यांचे स्वागत करताना खराडे व दोरगे कुटुंबीय.
स्थैर्य, बारामती , दि. 9 सप्टेंबर : शेतीचे प्रमाण कमी होत असताना प्रत्येकास अन्न व भाजीपाला केमिकल मुक्त मिळण्यासाठी शेतकरी व ग्राहक यांनी पुढाकार घेऊन प्रकल्प उभे करावेत. सध्याच्या काळात नागरिकांचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी ’केमिकल फ्री ’ अन्नाची गरज असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. नीलम किसान न्यूट्रीमार्ट या ऑरगॅनिक शॉपीचा उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाला. या वेळी अजित पवार बोलत होते.
या प्रसंगी बारामती तालुका राष्ट्रवादी चे अध्यक्ष राजवर्धन शिंदे, मा. अध्यक्ष संभाजी होळकर, बारामती बँकेचे चेअरमन सचिन सातव, माळेगाव कारखान्याचे संचालक नितीन सातव, माजी नगरसेवक जयसिंग देशमुख, अमर धुमाळ, महाराष्ट्र क्रीडाई चेअरमन प्रफुल्ल तावरे, खजिनदार सुरेंद्र भोईटे, बारामती क्रीडाई चेअरमन दत्तात्रय बोराडे, बारामती क्रीडाई वुमन विंग अध्यक्ष डॉ. स्मिता बोराडे ,जिजाऊ संघाचे अध्यक्ष स्वाती ढवाण, आर के बाजारचे उद्योजक मनोज डुंबरे, किसान उद्योग समूहाचे गोकुळ देवरे, गुळ उत्पादक हेमनाथ नलावडे आदी मान्यवर उपस्थित होते.
केमिकल फ्री पदार्थ विक्री करणे धकाबुकीच्या जीवनामध्ये जीवनावश्यक वस्तूमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ होत आहे त्यामुळे गंभीर अशा आजारांना माणसांना सामोरे जावे लागत आहे हे डोळ्यासमोर ठेवून ग्राहकांना भेसळ विहिरीत पदार्थ कसे मिळतील याचा प्रयत्न या शॉपी मधून होणार असल्याचे राजेंद्र खराडे, निलेश दोरगे, नीलम दोरगे, शारदा खराडे यांनी सांगितले .