
75 रक्तदात्यांनी केले रक्तदान
स्थैर्य, रहिमतपूर दि 29 : कोवीड 19 या संसर्गजन्य आजारात महाराष्ट्र शासनाने सुचीत केलेप़माणे आर्वी ग्रामपंचायत व गावातील तरूण युवक यांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात 75 रक्त दात्यांनी रक्तदान करून महाराष्ट्र शासनाच्या आव्हानास प्रतिसाद दिला सरपंच सविता राऊत यांनी उद्घ़ाटन केले यावेळी उपसरपंच प्रकाश पाटील पंकज पवार बाळासाहेब जाधव विकास जाधव प्रकाश जाधव संजय पाटील अधिक पवार दिनेश काळे प्रमोद सांळुखे ग्रामविकास अधिकारी विजय ढाणे डॉ. जमादार ग्रा.पं.कर्मचारी आर्वी ग्रामस्थ उपस्थित होते.