रेस्टॉरंटमध्ये खानपानाला परवानगी देण्यासाठी मुख्यमंत्र्यांना साकडे


 

स्थैर्य, मुंबई, दि.२५: लॉकडाउनचा मोठा फटका हॉटेल व्यवसायाला बसला आहे. अनलॉक चार किंवा मिशन बिगीन अंतर्गत अनेक उद्योग-व्यवसाय सुरु झाले आहेत. पण हॉटेल व्यवसाय अजूनही पूर्ण क्षमतेने सुरु होऊ शकलेला नाही. महाराष्ट्रात हॉटेल व्यवसायावर आजही निर्बंध कायम आहेत. महाराष्ट्र सरकारने एक जूनपासून राज्यात हॉटेल, रेस्टॉरंट उघडायला अनुमती दिली. पण ही परवानगी फक्त पार्सल आणि होम डिलिव्हरीपुरता मयार्दीत आहे. हॉटेलमध्ये बसून खाण्यापिण्यावर अद्यापी बंदी कायम आहे.

लॉकडाउनमुळे हॉटेल उद्योग संकटात सापडला आहे. डाइन इन सर्व्हीस म्हणजे ग्राहकांना हॉटेलमध्ये बसून खानपानाची परवानगी दिली नाही, तर अनेकांना आपली हॉटेल्स बंद करावी लागतील अशी स्थिती आहे. हॉटेल चालकांच्या विविध संघटनांनी यासंबंधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन या समस्येकडे लक्ष वेधले आहे.

सरकारने राज्य परिवहन सेवा, मुंबईत बेस्ट आणि पुण्यात पीएमपीएमएलला पूर्ण क्षमतेने बस सेवा सुरु करण्याची परवानगी दिली आहे. असे, असताना हॉटेलवर निर्बंध ठेवण्यामध्ये काही अर्थ नाही असे रेस्टॉरंट मालकांनी सांगितले. परवानगी मिळाली तर, सॅनिटायझेशन, सोशल डिस्टन्सिंग या सर्व नियमांचे पालन करु असे रेस्टॉरंट चालकांनी आश्वासन दिले आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!