
स्थैर्य, फलटण, दि. 28 नोव्हेंबर : प्रभाग क्रमांक ६ मधील भाजप उमेदवार मंगलादेवी नाईक निंबाळकर आणि किरण राऊत यांनी मतदारांना सर्वांगीण विकासाचे आश्वासन दिले आहे. त्यांनी आवाहन केले आहे की, आपल्याला प्रभागाचा सर्वांगीण विकास साधायचा आहे, त्यासाठी मतदारांनी साथ द्यावी.
या दोन्ही उमेदवारांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि नगराध्यक्षपदाचे उमेदवार समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे. या दोन नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांगीण विकास सहज शक्य आहे, असे ते मतदारांना समजावून सांगत आहेत.
रणजितदादांचा विकास दृष्टिकोन आणि समशेरसिंह दादांचा स्थानिक सहभाग यामुळे प्रभागाच्या समस्या लवकरात लवकर दूर होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
त्यांनी मतदारांना भरघोस मतांनी आम्हाला विजयी करा, असे आवाहन केले आहे. विकासाच्या या महत्त्वाच्या संधीसाठी भाजपला सत्ता देणे आवश्यक आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.

